नवी दिल्ली – नायजेरीयातील सागरी चाच्यांनी 5 भारतीयांचे अपहरण केले आहे, विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी ही माहिती दिली आहे. या भारतीयांची सुटका व्हावी यासाठी स्वराज यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा नायजेरिया सरकारकडे वरिष्ठ पातळीवर करण्याच्या सूचना नायजेरीयाच्या भारतीय उच्चायुक्तालयाला दिल्या आहेत. नायजेरीयतील भारतीय राजदूत अभय ठाकूर यांच्याकडून स्वराज यांनी या संदर्भातील अहवालही मागवला आहे.
नायजेरियामध्ये 5 भारतीय खलाशांचे सागरी चाच्यांनी अपहरण केल्याचे वृत्त आपल्याला वृत्तवाहिन्यांवरून समजले. त्यासंदर्भात नागजेरियातील उच्चायुक्ताने नाजजेरिया सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी सूचना आपण केली असल्याचे त्यांनी ट्विटरवर सांगितले.
या भारतीय खलाशांचे अपहरण गेल्या महिन्यातच झाले आहे. तसेच एमटी ऍपेकस हे जहाज बोनी आऊटर या जहाज नांगरणीच्या खोऱ्यामध्ये नेण्यात आले असल्याचे वृत्त भारतीय प्रसिद्धी माध्यमांनी नुकतेच प्रसिद्ध केले आहे.