काठमांडू – नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, सकाळी 7.58 च्या सुमारास 5.5 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंप इतका तीव्र होता की, बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये त्याचा परिणाम दिसून आला.
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने लोक घरीच होते. अशा स्थितीत सकाळी भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. भूकंपाचे धक्के जाणवताच लोकांनी घराबाहेर धाव घेतली. मात्र, सुदैवाने भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही.