वाई – आपणा सर्वांनाच भाववाढीला तोंड द्यावे लागत आहे. विकसनशील देशात भाववाढ अटळ असते. अवर्षणामुळे किंवा कामगारांच्या पगारवाढीच्या मागण्यामुळे भाववाढ होते, असे सांगण्यात येते. पण ते खरे नाही. चलनवाढ व करवाढ यामुळेच भाववाढ होते. जगातील सर्व भांडवलशाही देशांत भाववाढ होत असल्याचे दिसते. या उलट समाजवादी देशात भाव स्थिर असल्याने किंवा कमी झाल्याचे दिसते. म्हणून भाववाढ थांबवायची असेल तर आपल्या देशात समाजव्यवस्था आली पाहिजे, असे डॉ. कल्पना जवळेकर यांनी मत मांडले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्रप्रेम निर्मिले
कोल्हापूर – परकियांच्या सेवा चाकरीत धन्यता मानणाऱ्या, दुहीन पोखरलेल्या माणसात शिवरायांनी राष्ट्रप्रेम जागृत केले. न्यायनीतीची मर्यादा राखणारी प्रबळ युवती आणि समुदाय उभारण्याचे चातुर्य शिवरायांच्या अंगी होते म्हणून मरगळलेल्या माणसात त्यांनी नवचैतन्य पेरलं. धीरोदत्त गंभीर, सर्वमान्य महापुरूष म्हणजे शिवाजी राजे. राजा हा वटवृक्षासारखा असतो. त्याच्या छत्राखाली मी सुरक्षित आहे ही भावना शिवशाहीत दृढ झाली. राष्ट्रप्रेमाचा एक नवा आदर्श शिवरायांनी घालून दिला आहे, असे परखड उद्गार प्रा. स्वर्णलता भिशीकर यांनी येथे बोलताना काढले.