महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांची माहिती
मुंबई – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध ‘महाराष्ट्र सायबर’ने कठोर पावले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात ४५३ गुन्हे दाखल झाले असून २३९ व्यक्तींना अटक केली आहे.अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.
महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४५३ गुन्ह्यांची (ज्यापैकी २७ N.C आहेत) नोंद १जून २०२० पर्यंत झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४५३ गुन्ह्यांची (ज्यापैकी २७ N.C आहेत) नोंद ०१ जून २०२० पर्यंत झाली आहे.
या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १८८ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १८१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २३९ आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स टेकडाऊन (takedown) करण्यात यश आले आहे.
मुंबई काळाचौकी- एका गुन्ह्याची नोंद…
मुंबई विभागातील काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे,त्यामुळे मुंबई शहरात नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या २८ वर गेली आहे . सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या व्हाट्सअपद्वारे विविध व्हाट्सअप ग्रुप्सवर कोरोनाग्रस्त नागरिकांबद्दल चुकीची व खोटी माहिती पसरवून ,त्यांची नावे देखील जाहीर केली होती व कोरोनाग्रस्त नागरिकांची नावे जाहीर न करण्याच्या नियमांचे उल्लंघन केले होते.