लोणी-धामणी – भूर्रर, उचली की टाक सेंकद… अशा पहाडी आवाजात धामणी (ता. आंबेगाव) येथील बोऱ्हाडे मळ्यातील श्री लालखनबाबा यात्रा उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतींनी घाट दणाणून गेला होता. या शर्यतीत दोन दिवसांत450 बैलगाडे धावले. उष्णता असूनही बैलगाडा घाटात शौकिनांनी तुफान गर्दी केली होती. रविवार (दि. 8) यात्रेच्या पहिल्या दिवशी शिवशंभो ग्रूप – जांबुत, राजुशेठ पांडुरंग निघोट, रामविजय देविदास तळेकर यांचे गाडे, तर सोमवारी (दि. 9) किशोर कोंडिभाऊ हिंगे, ईश्वरशेठ सदाशीव काळे, ज्ञानेश्वर पर्वतराव देशमुख यांचे गाडे अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय आले.
पहिल्या दिवशी पहिल्यात पहिला – नवनाथ विठ्ठल लांघे, दुसऱ्यात पहिला – मामा भाचे जुगलबंदी, तिसऱ्यात पहिला – अक्षय सुखदेव बगाटे , चवथ्यात पहिला – दत्ताशेठ हरिभाऊ वाव्हळ यांचे गाडे फळीफोड ठरले आणि दुसऱ्या दिवशी पहिल्यात पहिला – श्रीकांतशेठ नवनाथ थोरात, दुसऱ्यात पहिला – प्रविण रामदास डफळ, तिसऱ्यात पहिला – शिकोजीबाबा बैलगाडा संघटना, चौथ्यात पहिला – राजेश भिकाजी जैद यांचे गाडे फळीफोड ठरले.
यावेळी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, यात्रा कमेटी माजी अध्यक्ष गजाराम जाधव पाटील, लालखनबाबा उत्सव समिती अध्यक्ष रमेश बोऱ्हाडे, सरपंच सागर जाधव, माजी अध्यक्ष महादेव बोऱ्हाडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नितीन जाधव, समीर तांबे, शरद जाधव, संजय जाधव, राजाराम बोऱ्हाडे, शांताराम जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब बोऱ्हाडे, बबन बोऱ्हाडे, बाबाजी बोऱ्हाडे, हिरामण बोऱ्हाडे, दिलीप वाघ, पोपट बोऱ्हाडे, बाळासाहेब जाधव, संदीप रोडे, रंगनाथ जाधव, पंढरीनाथ बोऱ्हाडे आणि मोठ्या संख्येने गाडा मालक व गाडा शौकीन, ग्रामस्थ उपस्थित होते.