ढाका : भारत सरकारच्या राष्ट्रीय नागरिकत्च सुचीनंतर (एनआरसी) गेल्या दोन महिन्यात 445 बांगलादेशी मायदेशी परतले आहेत, अशी माहिती बॉर्डर गार्ड बांगलादेशचे महासंचालक महंमद शफनिुल इस्लाम यांनी दिली.
भारतातून बांगलादेशमध्ये प्रवेश करणाऱ्या एक हजार जणांना 2019 मध्ये ताब्यात घेण्यात आले. तर 445 जण देशात नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये परतले, असे ते म्हणाले. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून त्यांची ओळखपटवण्यात आली. बेकायदा घुसखोरीच्या 253 केसेस दाखल करण्यात आल्या. त्यात दर तीनपैकी एक केस ही मानवी तस्करीशी संबंधीत होती. मात्र घुसखोरीच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांत कोणताही तणाव नाही.
दोन्ही देशात होणारी घुसखोरी रोखणे हे आमचे मुख्य कर्तच्य आहे. ते आम्ही पार पाडत राहू. भारतीय सीमा सुरक्षा दलाशी बैठकीसाठी इस्लाम यांच्या नेतृत्वाखालील बीजीबीचे शिष्टमंडळ आले होते. त्यावेळी त्यांनी एनआरसी हा भारताचा अंतर्गत मामला असल्याचे सांगितले होते.