मुंबई : कोरोना विषाणूने राज्यात कहर केला आहे. कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असल्याने प्रशासनासमोर मोठं आव्हान निर्माण झाले आहे. रविवारी दिवसभत मुंबईत ४४१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभर २१ जणांचा आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
441 new #COVID19 cases & 21 deaths have been reported in Mumbai today, taking the total number of cases to 8613 & deaths to 343. Total 1804 patients discharged till today: Public Health Department, Mumbai. #Maharashtra pic.twitter.com/SVF3mjYHgN
— ANI (@ANI) May 3, 2020
मुबंईत एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ८ हजार ६१३ वर पोहचला असून, १ हजार ८०४ कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत कोरोनमुक्त झाले आहेत. मुबंईत वाढत्या कोरोनाबाधितांमुळे सरकारची चिंता वाढली आहे. लॉकडाऊन असताना देखील मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत असल्याने मुंबईत कोरोनाचे काळे ढग निर्माण झाले आहे.
आशियाखंडतील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावीत आज ९४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर धारावीतील एकुण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ५९० वर पोहचला आहे. धारावीत २० जणांचा आतापर्यंत कोरोना विषाणूने बळी गेला आहे. ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तो भाग पोलिसांनी सील केला आहे. तसेच शहरात लॉकडाऊन अधिक कडक करण्यात आले आहे. मुंबई रेडझोनमध्ये असल्याने प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.