मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे राज्य सरकार देखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. अशामध्ये राज्य सरकारकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्यातील ११ हजार कैद्यांना तातडीने पॅरोलवर सोडण्यात येणार आहे. तशा सूचना संबंधित प्रशासनांना दिल्या असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
७ वर्ष किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील ६० तुरूंगांतील
जवळ-जवळ
११,००० आरोपी / गुन्हेगारांना तातडीने पारोल देण्याचे मी आदेश दिले आहेत. पुढील आठवड्याभरात यावर कारवाई व्हावी अशाही सूचना दिल्या गेल्या आहेत.— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 26, 2020
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की, ‘७ वर्षेकिंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील ६० तुरूंगांतील जवळपास ११,००० आरोपी किंवा गुन्हेगारांना तातडीने पॅरोल देण्याचे आदेश दिले आहेत. तसंच, पुढील आठवड्याभरात यावर कारवाई व्हावी अशाही सूचना संबंधित प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.