Maharashtra Politics : राज्यात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाच्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या दाव्यामुळे महायुतीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. (Maharashtra Politics) बारामती येथे बोलताना रोहित पवार यांनी दावा केला की, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील जवळपास 40 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. काही पक्षनिष्ठ आमदार सोडले, तर अनेक आमदार संपर्कात आहेत. 2029 च्या निवडणुकीपूर्वी सर्व चित्र स्पष्ट होईल, असं खळबळजनक विधान त्यांनी केले. (Maharashtra Politics) या दाव्यानंतर पुन्हा एकदा राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल झाले होते. त्यामुळे रोहित पवार यांच्या विधानाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics) याचवेळी रोहित पवार यांनी खासगी विमान सुरक्षेचाही मुद्दा उपस्थित केला. त्यांनी म्हटले की, खासगी विमानांसंदर्भात कठोर आणि स्पष्ट कायदा असणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात आणखी दुर्घटना घडू शकतात. (Maharashtra Politics) दादा जाऊन 4 महिने झाले. दादांच्या अपघाताच्या तपासासाठी अधिवेशनात स्मरण पत्र द्यावं लागलं. अजित पवार आणि आमची एकच इच्छा असल्यामुळे विलिनीकरणाची चर्चा शेवटच्या टप्प्यात आली होती. दादा गेल्यामुळे चर्चा थांबली, असंही रोहित पवार यांनी म्हटले आहे. (Maharashtra Politics)