नवी दिल्ली: गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये झालेल्या संघर्षात 40 चीनी सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केंद्रीय मंत्री रवी शकर प्रसाद यांनी केला. चीनी बाजूच्या जीवीतहानीची पहिल्यांदाच उच्च पदस्थ व्यक्तीने माहिती दिली आहे.
प्रसाद म्हणाले, भारताला शांती हवी आहे. प्रश्न चर्चेने सोडवायचे आहेत. मात्र मातृभूमीकडे कोणी नजर वाकडी करून पाहणार असेल त्यांना चोख प्रत्यूत्तर देण्यात येईल. प. बंगालमधील व्हर्च्यूअल रॅलीत प्रसाद बोलत होते.
जर आमचे 20 जवान शहीद झाले असतील तर त्याच्या दुप्पट बळींची संख्या चीनी बाजूला आहे. त्यामुळेच ते कोणतीही आकडेवारी जाहीर करत नाहीत.