हॅमिल्टन : भरात असलेल्या भारतीय संघाचा आज न्यूझीलंडशी तिसरा टी-20 सामना होत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी भक्कम आघाडी घेतलेल्या भारताला आजच्या सामन्यासह मालिका जिंकण्याची संधी आहे. या सामन्यातही नाणेफेक आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या दोन गोष्टी पुन्हा एकदा निर्णायक ठरणार आहेत.
भारत-न्यूझीलंड दरम्यानच्या तिस-या टी-20 सामन्यास थोड्यात वेळात वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल हा न्यूझीलंडच्या बाजूने लागला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केले आहे.
A toss win for Kane Williamson and we will bowl at Seddon Park in T20I 3. #NZvIND pic.twitter.com/1UzfnUWD1Z
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 29, 2020
दरम्यान, न्यूझीलंडमध्ये टी-20 मालिका जिंकण्याची भारतीय संघाला प्रथमच संधी मिळणार आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २००८-०९ व २०१९ साली अनुक्रमे २-० व २-१ अशी मालिका गमवावी लागली होती. त्याचा वचपा काढण्याची यंदा विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला मिळाली आहे.