त्रिनिनाद – विराट कोहलीची शानदार शतकी आणि श्रेय्यस अय्यरच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर भारताने बुधवारी तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह भारताने वेस्टइंडिजविरूध्द टी-20 पाठोपाठ आता एकदिवसीय मालिकासुध्दा 2-0 ने खिशात घातली आहे.
King for a reason ??#TeamIndia take the ODI series 2-0 ???? #WIvIND pic.twitter.com/Wr8tZJO5e1
— BCCI (@BCCI) August 14, 2019
तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळं सामना 35 षटकांचा खेळवण्यात आला. विंडीजनं 7 बाद 240 धावा केल्या. मात्र त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 35 षटकांत 255 धावांचे आव्हान मिळालं. भारताने हे आव्हान 32.3 षटकांतच 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
भारताकडून फलंदाजीत विराट कोहलीने 99 चेंडूत 14 चौकारासह 114 धावा केल्या तर श्रेय्यस अय्यरने 41 चेंडूत (3 चौकार आणि 5 षटकारासह) 65 धावा करत महत्वपूर्ण कामगिरी केली. विराटनं त्याच्या कारकिर्दीतील 43 वं एकदिवसीय शतक केलं. वेस्टइंडिजकडून फॅबियन एलनने 2 आणि केमार रोचने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
तत्पूर्वी वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. अखेरचा सामना खेळणाऱ्या ख्रिस गेलनं वादळी खेळी केली. त्यानं 41 चेंडूत 72 धावांची खेळी केली. त्यानंतर एविन लुईसनं 29 चेंडूत 43 धावां फटकावल्या. दोघांनी 115 धावांची भागिदारी केली. मात्र लूईस बाद झाल्यानंतर विंडीजचा डाव गडगडला. त्यामुळे वेस्ट इंडिजला 35 षटकांत 7 बाद 240 पर्यंत मजल मारता आली. भारताकडून गोलंदाजीत खलील अहमदने 3, मोहम्मद शमीने 2, युजवेंद्र चहलने1 आणि रविंद्र जडेजाने 1 गडी बाद केला.