नवी दिल्ली – पाकिस्तानने भारतविरोधी कुरापतींचे सत्र कायम ठेवले आहे. चालू वर्षी पाकिस्तानी सैनिकांनी 3 हजार 800 हून अधिक वेळा शस्त्रसंधीचा भंग करत नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत मारा केला. शस्त्रास्त्रं आणि अंमली पदार्थ तस्करीला चालना देण्याची आगळीक पाकिस्तानकडून होत असल्याचेही निष्पन्न झाले.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत पाकिस्तानी कुरापतींचा पाढा वाचला. जम्मू-काश्मीरात घुसखोरी करणे दहशतवाद्यांना सुलभ व्हावे या उद्देशातून पाकिस्तानी सैनिकांकडून शस्त्रसंधी भंग केला जातो, असे त्यांनी नमूद केले.
भारतीय सुरक्षा दलांचे लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानी सैनिक एलओसीलगत मारा करत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. श्रीवास्तव यांनी ड्रोनच्या माध्यमातून होणाऱ्या तस्करीच्या घटनांकडे लक्ष वेधताना त्यामागे पाकिस्तान असल्याचे सूचित केले. द
हशतवादी आणि गुन्हेगारांसाठी पाकिस्तान सुरक्षित आश्रयस्थान आहे. दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांबरोबरच कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानने अजून कुठली कारवाई केली नसल्याचेही त्यांनी म्हटले.