पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यावर आणि जम्मूला केंद्रशासित राज्य बनवण्यावर अनेक तर्क-वितर्क समोर आले आहेत. विरोधी पक्षाने सरकारचा निर्णय हा घटनेप्रमाणे नसल्याचे सांगत सरकारने घटनेचा अपमान केला असल्याचा आरोप केला. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 रद्द करणारे हे दहशतवादाला सहनुभूती देणारे असल्याचे सांगत विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 ला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी जे लोक याचा विरोध करत आहेत त्यांची यादी पाहिली तर हातावर मोजण्याइतकी या लोकांची संख्या असून हे त्याच परिवारतील लोक आहेत जे स्वार्थी आणि राजकारणाच्या पलीकडे जावून काही विचारच करू शकत नाही असे म्हटले. तसेच सरकारच्या या निर्णयाला विरोध करणारे दहशतवादाला सहानुभूती देणारे असल्याचीही टीका यावेळी पंतप्रधानांनी केली.तसेच सरकारच्या निर्णयाला त्या पक्षांनीही पाठींबा दिला ज्यांचा सरकारला पुर्वीपासून विरोध होता त्यांनी सरकारच्या या निर्णयाल पाठिंबा दिला कारण त्यांनी राजकारणच्या पलिकडे जावून राष्ट्राचा विचार केला. तसेच आजपर्यंत ज्या गोष्टी कठीण वाटत होत्या त्या आता सत्यात उतरल्या आहेत याला देशातील नागरिकांनी समर्थन दिले आहे असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.