नवी दिल्ली – केंद्र सरकारने 370 रद्द करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याच्या विरोधात नॅशनल कॉन्फरन्सने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या पक्षाचे नेते मोहंमद अकबर लोन आणि हसनैन मसुदी यांनी ही याचिका दाखल केली आहे.
370 च्या संबंधात राष्ट्रपतींनी काढलेली अधिसूचना घटनाबाह्य ठरवून ती रद्द बातल करावी अशी त्यांची मागणी आहे. या अनुषंगाने केंद्र सरकारने जम्मू काश्मीर रिऑर्गनाझेशन विधेयक 2019 संसदेत संमत करून घेतले आहे. तो निर्णयही घटनाबाह्य ठरवण्यात यावा अशी मागणी त्या पक्षाच्या वतीने याचिकेत करण्यात आली आहे.
या याचिकेवर अजून निर्णय व्हायचा आहे. आज केवळ ही याचिका दाखल झाली असून त्यावर प्राथमिक सुनावणी होऊन ती रितसर सुनावणीसाठी घ्यायची की नाही यावर निर्णय होईल.