पुणे: लॉकडाउनमुळे मागील दीड महिन्यापासून पुणे शहरात अडकून पडलेल्या परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या गावी पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार दि. ९ ते २१ मे या कालावधीत ३३ हजार ४२१ कामगार आणि नागरिकांना रेल्वेने त्यांच्या मुळगावी पाठवून देण्यात आले आहे. पुणे शहर पोलिसांनी या कामात मोलाची कामगिरी बजावली.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आले. त्यानंतर पुणे शहरात राहणारे हजारो परप्रांतिय कामगार, विद्यार्थी, नागरिक अडकून पडले होते. एकीकडे हाताला काम नाही, पैसा नाही आणि दुसºया बाजुला कोरोनाचे संकट आल्यामुळ ते अडचणीत सापडले होते.