नागपूर – राज्यात उन्हाचा चटका असह्य होत आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट आली आहे. त्यामुळे शक्यतो नागरिकांनी कामा व्यतिरिक्त घरा बाहेर पडणे टाळावे. नागपूर जिल्ह्याचा पारा 44 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ शकतो असा अंदाज नागपूर हवामान खात्याने वर्तवलाय. जिल्ह्यात मंगळवारी 43 तापमानाची नोंद करण्यात आली असून, काही दिवस वातावरण असेच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, नागपूर शहरात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, मंगळवारी जिल्ह्यात बेशुद्ध अवस्थेत तिघांचा मृतदेह आढळून आले आहेत. या तिघांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कपिल नगर, जुनी कामठी आणि देवलापार परिसरात मृतदेह आढळल्याची माहिती आहे. तिन्ही प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
सध्या नागपूर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना उन्हापासून स्वतःचा बचाव करावा आणि दुपारच्या वेळी कोणीही काम शिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन केलं आहे. नागपूर जिल्ह्यात दुपारी 12 ते 4 या वेळेत तीव्र उन्हाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता नागपूरकरांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.