नवी दिल्ली- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका सगळ्या जगाला बसला आहे. त्यात कोरोनाची भीती लहान मुलांना आणि वयस्करांना जास्त आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं होतं मात्र भारतात येत्या 10 महिन्यात 3 लाख बालकं दगावतील अशी भीती युनायटेड नेशन्स चिल्ड्रन इमरजेन्सी फंडने (युनिसेफ) व्यक्त केली आहे.
ही मुलं कोरोनामुळे दगावणार नाही. मात्र कोरोनाच्या परिस्थितीत पुरेशा आरोग्य सेवा मुलांना न मिळाल्याने त्याचा परिणाम या बालकांच्या आरोग्यावर होऊ शकतो आणि त्याचे गंभीर परिणाम भारताला भोगावे लागणार अशी शक्यताही त्यांनी दर्शवली आहे.
फक्त भारतातच नाही तर दक्षिण आशियातील पाच वर्षाखालील बालकांचं मृत्यूचं प्रमाण 4 लाख असू शकेल, त्यामुळे जगाला या मोठ्या संकटावर मात करावी लागणार आहे.
आरोग्य संघटना ज्या देशातील मजबूत नाही त्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. त्यामुळे आर्थिक संस्थांवरचाही ताण वाढतो आहे. काही देशातील लसीकरणाची मोहिम कोरोनामुळे स्थगित केली आहे.