नगर – गरीब, वंचित ग्रामीण कुटुंबांना आरोग्य सेवा पुरविणे च्या हेतूने केंद्र सरकारने आर्थीक दुर्बल कुटुंबांसाठी एकाचवेळी 445 जिल्ह्यात लागू केलेल्या आयुष्यमान भारत योजनेसाठी जिल्ह्यात 3 लाख 60 हजार लाभार्थी आहेत असून त्यात ग्रामीण भागात 2 लाख 68 हजार परिवार आहेत. तर शहरी भागात 51 हजार 844 परिवार आहेत. आता पर्यंत या योजनेतील 3 लाख लाभार्थी नागरिकांना गोल्ड कार्ड वाटप करण्यात आले.
23 सप्टेंबरपासुन सुरु झालेल्या या योजनेला शासकीय रुग्णालयात लागु करण्यात आली होती. 2011 साली झालेल्या सव्हेक्षणातील कुटुंबांना योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधा यातुन मिळणार आहे. अलीकडेच खासगी रुग्णालयांमध्येही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सध्या जिल्ह्यातील 25 खाजगी रुग्णालयात सुरू केली.
या योजनेत अंतर्गत जिल्ह्यातील 26 रूग्णालये यर राज्यात 493 रुग्णालयांमार्फत उपचार केल्या केले जाताहेत. आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत 2011 च्या सर्वेक्षणानुसार राज्यातील 83.72 लाख कुटुंबांना पाच लाखांपर्यंत मोफत आरोग्य उपचार होणार आहेत. या लाभार्थी कुटुंबीयांना वर्षभरात पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळतील.
लाभार्थी कोण
आयुष्मान भारत योजनेसाठी शहरी भागातील 11 वर्गातील कुटुंबाचा समावेश केला आहे. यामध्ये कचरावेचक, बांधकाम मजूर घरकाम करणारे, फेरीवाले,भिकारी आदी वर्गातील कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. तर ग्रामीण भागामध्ये घराची भौगोलिक स्थिती, कुटुंबातील कमावत्या व्यक्ती, अनुसूचित जाती व जमाती, भूमिहीन शेतकरी, आदी वर्गातील कुटुंबांची निवड करण्यात आली आहे.