काबूल – तालिबानचे नियंत्रण असलेल्या अफगाणिस्तानातील एका भागातून तीन भारतीय अभियंत्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती भारतीय दूतावासाने दिली आहे.
या तिन्ही जणांना एअर लिफ्ट करण्यात आले आहे. संबंधित अभियंते एका धरण प्रकल्पावर काम करत होते. दरम्यान तालिबानने या भागावर ताबा मिळवला. त्यामुळे हे तिन्ही अभियंते याच भागात अडकून पडले होते.
यासंदर्भात अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पावले उचलत, संबंधित तिन्ही अभियंत्याची सुखरुप सुटका केली आहे. या तिन्ही भारतीय अभियंत्यांना विमानाच्या मदतीने सुरक्षितपणे काबूलपर्यंत आणण्यात आले आहे.
दरम्यान, यापूर्वीच भारत सरकारकडून अफगाणिस्तानातील भारतीय नागरिकांना मायदेशी परतण्याच्या सूचना करण्यात आलेल्या ओहत.