गुवाहटी – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटी येथे होत आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने आठ गडी राखून जिंकला. आता टीम इंडियाला दुसरा सामनाही जिंकून टी-20 मालिका जिंकायची आहे.
दरम्यान, त्यापूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल(टाॅस) हा दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं लागला आहे. (South Africa won the toss and elected to field) आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.
2ND T20I. South Africa won the toss and elected to field. https://t.co/R73i6R9pps #INDvSA @mastercardindia
— BCCI (@BCCI) October 2, 2022
दरम्यान, भारताने आतापर्यंत घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका जिंकलेली नाही. अशा परिस्थितीत हा सामना जिंकून भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या भूमीवर पहिली टी-20 मालिका जिंकण्याची संधी आहे.