बीड – राजधानी दिल्ली येथे कर्तव्यावर असताना महाराष्ट्रातील सुपुत्राला वीरमरण आले आहे. बीड जिल्ह्यातील हिंगणी गावातील जवान अविनाश कल्याण आंधळे वय 29 असे या जवानाचे नाव आहे. जवान अविनाश शहिद झाल्याची बातमी कळताच हिंगणे गावासह राज्यभर शोककळा पसरली आहे. शेतकरी कुटुंबातील असलेले शहिद जवान अविनाश ६ वर्षापासून देशसेवा बजावत होते.
शहिद जवान अविनाश यांचे पार्थिव आज दुपारी त्यांच्या मुळ गावी हिंगणी येथे दिल्लीहून आणले जाणार असून त्यांच्या पार्थिवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
शहिद जवान अविनाश त्यांचे वडिल शेतकरी आहेत त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे. शहिद अविनाश यांच्या अचानक एक्झिट मुळे आंधळे कुटुंबीयावर मोठे संकट ओढावले आहे.