नवी दिल्ली : उत्तर भारतात अवकाळी पावसामुळे वीज पडून गेल्या 24 तासांमध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वादळी पाऊस आणि गारपिटीने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पुढच्या ४८ तासांत मृतांच्या कुटुंबियांना हि मदत पोहचविण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
शुक्रवारी उत्तर भारतात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, दिल्लीमध्येही शनिवारी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.
UP Government: 28 people have lost their lives in last 24 hours due to lightening strike in various parts of the state. Chief Minister Yogi Adityanath has announced a compensation of Rs 4 lakhs each to the family of deceased.
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 13, 2020
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर, खिरी, आणि सीतापूर इथे प्रत्येकी 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच कानपूर ग्रामीण, मिर्झापूर, सिद्धार्थनगर, चंदौली, अयोध्या, वाराणसी, गोरखपूर, बलरामपूर जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका जणांचा मृत्यू झाला आहे.