सातारा – जिल्ह्यात लंपी स्किनच्या प्रादुर्भावामुळे बुधवारी दिवसभरात सात जनावरांचा मृत्यू झालो. त्यामुळे आजपर्यंत नऊ तालुक्यातील 65 गावांमध्ये एकूण 27 जनावरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजअखेर 439 जनावरांना लंपी स्किन आजाराची बाधा झाली असून 77 जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. जिल्ह्यात एकूण एक लाख 16 हजार 499 जनावरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली.
कराड तालुक्यातील वाघेरी 20, यादववाडी 1, कापील 3, कामठी 3, पाल 6, मालखेड 6, आनंदवाडी 3, किवळ 1, भांबे 1, थोरातमळा 1. फलटण तालुक्यात खामगाव 26, जिंती 17, फडतरवाडी 25, चव्हाणवाडी 7, पाडेगाव 22, सोनवडी 9, कुरवली बुद्रुक 7, धुळदेव 1, फरांदवाडी 7, आसू 8, हणमंतवाडी 7, गिरवी 3, डोंबाळवाडी 1, मानेवाडी 1, ढवळ 2, नांदल 4, मुंजवडी 2, चौधरवाडी 2, शिंदेवाडी 4, जावळी 3, सासवड 3, सातारा तालुक्यात कोडोली (पांढरवाडी) 31, महागाव 11, माजगाव 1,
कारंडवाडी 9, आंबळे 1, पाडळी 1, वाढे 4, खटाव तालुक्यातील अनपटवाडी 53, मानेवाडी 8, मोराळे 7, धोंडेवाडी 18, खातगुण 2, काळेवाडी 4, राजापूर 6, खटाव 3, गणेशवाडी 2, निमसोड 5, पडळ 12, तडवळे 5, पुसेसावळी 5, नढवळ 3, बिटलेवाडी 1, वडूज 2, गोपूज 1, पाटण तालुक्यातील मारुल हवेली 1, तारळे 11, कोरेगाव तालुक्यातील कठापूर 2, माण तालुक्यातील मोही 1, पिंगळी बुद्रुक 1, वावरहिरे 3, शेवरी 2, नरवणे 1, खंडाळा तालुक्यातील मोर्वे 15, जावळी तालुक्यातील मोरावळे येथे 1 अशा नऊ तालुक्यातील 439 जनावरांना लंपी स्किनची बाधा झाली आहे.
बाधित क्षेत्राच्या पाच किलोमीटर परिसरातील 333 गावांमधील जनावरांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात तीन लाख 52 हजार जनावरांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. आजअखेर एक लाख 16 हजार 900 जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून दोन लाख 81 हजार 900 लस उपलब्ध आहे, अशी माहिती डॉ. शिंदे यांनी दिली.
खटाव, फलटण तालुक्यात मृत्यूचे प्रमाण चिंताजनक
खटाव तालुक्यातील अनपटवाडी 3, मानेवाडी 2, मोराळे 1, धोंडेवाडी 1, निमसोड 2, पुसेसावळी 1, फलटण तालुक्यातील खामगाव 3, जिंती 4, फडतरवाडी 1, चव्हाणवाडी 1, सोनवडी 1, हणमंतवाडी 1, कराड तालुक्यातील वाघेरी 1, पाल 2, सातारा तालुक्यातील महागाव 1, पाटण तालुक्यातील तारळे 2 अशा पाच तालुक्यांतील 27 जनावरांचा मृत्यू झाला आहे. फलटण आणि खटाव तालुक्यातील मृत्यूची वाढती संख्या चिंताजनक आहे.