जीनिव्हा – उत्तर काेरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांनी दाेन वर्षांत देशातील सीमा पूर्णपणे बंद केल्या आहेत. देशात काेराेना संसर्गाचा धाेका निर्माण झाला आहे. संयुक्त राष्ट्राचे स्वतंत्र तपास अधिकारी थाॅमस आेजिया क्विंटाना यांनी मानवी हक्क समितीला याबाबतची माहिती दिली.
२.६० काेटी लाेकसंख्येचा उत्तर काेरिया आशियातील गरीब देशांपैकी आहे. उत्तर काेरिया दरवर्षी क्षेपणास्त्रांवर सुमारे ३.२ अब्ज डाॅलर (सुमारे २४ हजार काेटी रुपये) खर्च करते. देशात उपासमारीचे संकट असतानाही देशाचा खर्च क्षेपणास्त्रांवर केला जाताे.
उत्तर काेरियाबाबत संयुक्त राष्ट्राने एक स्वतंत्र अहवाल जाहीर केला आहे. त्यात उत्तर काेरियात खाद्यान्न संकटामुळे लाेकांनी आत्महत्या करण्यास सुरुवात केल्याचे धक्कादायक वास्तव नमूद करण्यात आले आहे. उत्तर काेरिया आशियातील इतर देशांपासून एकाकी पडला आहे. यापूर्वी हा देश एवढा एकाकी कधीही नव्हता.
उत्तर काेरियातील लाेकांच्या उदरनिर्वाहाचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचा जास्त परिणाम कमकुवत मुले व वृद्धांवर पडला आहे. माेठ्या संख्येने लाेक उपासमारीचे बळी ठरू लागले आहेत. उत्तर काेरियातील मानवी हक्काच्या स्थितीबद्दल संयुक्त राष्ट्राच्या विशेष प्रतिनिधींनी सहा वर्षांनंतर आपला अहवाल साेपवला आहे. त्याबद्दल क्विंटा म्हणाले, देशात आंदाेलन करण्यास निर्बंध आहेत. लाेकांना देशातून बाहेर पडण्यास बंदी आहे. त्यामुळे देशातील स्थिती खूप खराब हाेत चालली आहे.
उत्तर काेरियाच्या लाेकांना तत्काळ पायाभूत सामानाची गरज आहे. अन्यथा देशातील माेठ्या समुदायावरही उपासमारीची वेळ येऊ शकते. उपासमारी वाढत चालल्याची कल्पना हुकूमशहाला आहे, असे क्विंटाना यांच्या अहवालात म्हटले आहे. त्यासाठी किम जाँग उन यांनी काही पावलेही उचलली आहेत.