पोरबंदर- वंदे भारत मिशन अंतर्गत ऑपरेशन समुद्र सेतूचा भाग म्हणून इराणमध्ये अडकलेल्या 233 भारतीयांना घेऊन “आयएनएस’ शार्दुल आज दुपारी पोरबंदर बंदरावर दाखल झाले. सर्व निर्वासितांच्या देखरेखीची जबाबदारी राज्याच्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली होती.
या जहाजाने सोमवारी सायंकाळी इराणमधील बंदर अब्बास बंदरातून प्रवास सुरू केला होता. पोरबंदर बंदरावर पोहोचल्यानंतर लगेचच सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आली आणि कोविड -19 च्या दृष्टीने त्यांच्या सामानाचे जिल्हा आरोग्य पथकांनी निर्जंतुकीकरण केले.
सर्व प्रवाशांना सात मास्क आणि सेनिटायझर्स असलेले आयसीई किट्स देण्यात आले आहेत. या सर्वांना सात दिवस संस्थात्मक विलगीकरणात नेण्यात आले. या सर्व प्रवाशांपैकी बहुतेक जण वलसाड जिल्ह्यातील मच्छीमार आहेत