मुंबई : कोरोना वषाणूने राज्यात थैमान घातले आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असून,कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर पोहचला आहे. तसेच राज्यात मंगळवारी कोरोनाचे २३ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ५२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, २३ नव्या रुग्णामध्ये १० मुंबईत, ४ पुण्यात, ३ अहमदनगर, बुलडाणा दोन, नागपूर दोन, आणि सांगली, ठाण्यात प्रत्येकी १-१ रुग्ण आढळून आले आहे.
तसेच मुंबईतल्या धारावीत नवे दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. हि आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीत जवळपास १५ लाख लोक राहतात . धारावीच्या चार भागात डॉ. बालिगा नगर, वैभव अपार्टमेंट, मुकुंद नगर आणि मदिना नगर सील केले असून पालिका अधिकारी तेथे जंतुनाशकांची नियमित फवारणी करीत आहेत.