मुंबई: करोनाचे धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 6 हजार 875 कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर 219 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 30 हजार 599 वर पोहोचली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांमध्ये 4 हजार 67 रुग्ण बरे झाले. त्यामुळे राज्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्य आत्तापर्यंत 1 लाख 27 हजार 259 इतकी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 55.19 टक्के इतका झाला आहे.
सध्या राज्यातील मृत्यूदर 4.19 टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 12 लाख 22 हजार 487 नमुन्यांपैकी 2 लाख 30 हजार 599 नमुने करोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 49 हजार 263 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर 48 हजार 191 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
राज्यात मागील चोवीस तासात जे रुग्ण आढळले आहेत त्यानंतर राज्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 93 हजार 652 इतकी झाली आहे.
प्रमुख शहरांमधील ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई- 23 हजार 785
ठाणे- 30 हजार 506
नाशिक- 2534
औरंगाबाद- 3691
नागपूर- 491