नवी दिल्ली – नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीत सुरु असणाऱ्या आंदोलनाने उग्र रुप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाय म्हणून उत्तर प्रदेश सरकारकडून 21 जिह्ल्यातील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे.
दरम्यान, उत्तरप्रदेशचे डीजीपी ओपी सिंह यांनी माध्यमांना सांगितले, ‘राज्यातील परिस्थिती पाहता प्रशासनाने २१ जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आम्ही काही संघटनांच्या सक्रिय सदस्यांना अटक केली आहे यात खासगी संस्थासह, राजकीय पक्ष देखील आहे.” तत्पूर्वी, पश्चिम बंगालमधील इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली आहे होती.
OP Singh, UP DGP: We are not touching innocents and we will not spare people who were involved in it (violence). And that is the reason we have arrested active members of many organisations, whether it is PFI or any other political parties. #CAAProtests https://t.co/puFTLUNPhE
— ANI UP (@ANINewsUP) December 27, 2019