मुंबई – 2020 हे वर्ष सिनेसृष्टीसाठी चांगल वर्ष ठरताना दिसत नाही. या चालू वर्षात कोरोना विषाणूने अनेकांना आपल्या विळख्यात सामावून घेतलं. त्यातच वर्षभरात अनेक बॉलिवूड कलकार आणि सेलिब्रेटींच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांना व सिनेसृष्टीला मोठा धक्का दिला. या वर्षी बॉलिवुडमध्ये सगळ्यात पहिली एक्झिट घेतली ती प्रख्यात संवेदनशील अभिनेता इरफान खानने, त्यानंतर ऋषी कपूर, सुशांत सिंह राजपूत असे अनेक हरहुन्नरी कलाकार या चित्रपटश्रुष्टीने गमावले.
अभिनेता आणि मॉडेल समीर शर्मा – अभिनेता ‘समीर शर्मा’ याचा मृतदेह मुंबईतील त्याच्या राहत्या घरी किचनमधील सिलिंगला लटकलेल्या अवस्थेत सापडला. समीरने ‘कहानी घर घर की, क्यू की सांस भी कभी बहू थी, रिश्ता क्या केहलता है सह अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. समीरच्या जाण्यानं संपूर्ण मनोरंजन विश्व हादरून गेलं आहे.
मृत्यूपूर्वी समीर शर्मा अनेक दिवसांपासून कोणालाच भेटला नव्हता. जेव्हा त्याच्या घरातून दुर्गंध येऊ लागला तेव्हा सोसायटीच्या चौकीदाराने पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी जेव्हा घर उघडलं तेव्हा समीरचा मृतदेह सिलिंगला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
अभिनेता फराज खान – अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या ‘मेहंदी’ या चित्रपटातून तिच्या पतीच्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेता ‘फराज खान’ याचे निधन झाले. तो 46 वर्षांचा होता. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर मुळे त्रस्त असलेला फराज वर बंगळुरु येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.
बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट हिने फराजच्या निधनाची दु:खद बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. पूजा म्हणाली कि, “मी जड अंत:करणाने आपल्या सर्वांना ही बातमी देतेय की, फराज खानने हे जग सोडले आहे. आता त्याच्या आत्म्याला सती मिळावी म्हणून प्रार्थना करा. फराजच्या जाण्याने मनामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे,” असं पूजा म्हणाली.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत – बॉलिवूड अभिनेता ‘सुशांत सिंह राजपूत’ याने 14 जून रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येनंतर चित्रपटसृष्टीतील वातावरण चांगलेच तापले असून येथील घराणेशाही आणि कंपूशाहीविरूध्द बातम्यांनी सोशल मीडिया ढवळून निघाला. दरम्यान, सुशांतच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर हजारो छोटे-मोठे बदल घडून आले. त्यामध्ये घराणेशाही असो किंवा बॉलीवुडचे ड्रग्ज कनेक्शन.
अभिनेता चिरंजीवी सारजा – साऊथ इंडस्ट्रीतील अभिनेता ‘चिरंजीवी सारजा’ यांच वयाच्या 39 व्या वर्षी निधन झालं आहे. चिरंजीवी यांच हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. चिरंजीवी यांच्या निधनाने साऊथ चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली. चिरंजीवी यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे बंगळूरु येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
ऋषी कपूर – बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते ‘ऋषी कपूर’ यांचे 30 एप्रिल रोजी मुंबईत निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला पुष्टी दिली होती. ऋषी कपूर यांना 2018 रोजी पहिल्यांदा कर्करोग असल्याचं समोर आलं. त्यानंतर जवळपास 8 महिने न्यूयॉर्कमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. दरम्यान, ऋषी कपूर यांची अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू सुरू होते. मात्र कॅन्सरने त्यांना सोडले नाही.
वाजिद खान – बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीच्या संगीतकार जोड्यांपैकी एक असलेल्या साजिद-वाजिद जोडीतील ‘वाजिद खान’ यांचं मुंबईतील चेंबूर येथील रुग्णालयात एक जून रोजी निधन झालं. ते 42 वर्षांचे होते. ‘गर्व’, ‘तेरे नाम’, ‘तुमको ना भूल पाएंगे’, ‘पार्टनर’, ‘दबंग’ यांसारख्या चित्रपटांची गाणी लिहिली, गायली आणि संगीतही दिले. वाजिद यांना किडनीचा तसेच हृदयविकाराचा त्रास होता.
इरफान खान – या वर्षी बॉलिवुडमध्ये सगळ्यात पहिली एक्झिट घेतली ती प्रख्यात संवेदनशील अभिनेता इरफान खानने. केवळ बॉलिवुडच नाही तर हॉलिवुडमध्येही इरफान खानने अभिनयाचा डंका वाजवला होता. इरफानला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर नावाचा भयंकर कॅन्सर त्याला झाला होता. त्यावर मात करण्याचे त्याचे प्रयत्न सुरु होते परंतु 29 एप्रिल रोजी त्याने एक्झिट घेतली. इरफानच्या मृत्यूच्या दुःखात संपूर्ण बॉलिवुड आणि त्याचे प्रशंसक बुडाले होते.
अभिनेत्री चित्रा कामराज – दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील प्रख्यात अभिनेत्री चित्रा कामराज हिने आत्महत्या केली. मिळलेल्या माहितीनुसार,चेन्नईतील नसरपेट येथील हॉटेलमध्ये चित्राने गळफास घेतला. नैराश्य आल्यामुळे चित्राने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. इवीपी फिल्मसिटीमधील चित्रीकरण संपल्यानंतर चित्रा रात्री 2:30 वाजता हॉटेलमध्ये पोहोचली. त्यानंतर तिने गळफास घेतला.
रवी पटवर्धन – ज्येष्ठ मराठी अभिनेते रवी पटवर्धन यांचे 6 डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी ठाण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. पटवर्धन यांनी हिंदी आणि मराठी चित्रपट, मालिकामध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.
एस.पी. बालसुब्रमण्यम – प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं २५ सप्टेंबर रोजी निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आवाजाचा जादूगार असलेले एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी आजवर तेलगू, तामिळ, कन्नड, हिंदी, मल्याळम अश्या अनेक भाषांमध्ये जवळपास 40,000 गाण्यांना आपला आवाज दिला आहे.
निशिकांत कामत – ‘मुंबई मेरी जान’, ‘दृश्यम’, ‘फोर्स’, ‘मदारी’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांचे मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे 17 ऑगस्ट रोजी निधन झाले. ते 50 वर्षांचे होते.
सरोज खान – सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचं ३ जुलै रोजी निधन झालं. त्या 71 वर्षांच्या होत्या. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं. सरोज खान यांचा समावेश बॉलीवूडच्या दिग्गज नृत्यदिग्दर्शकांमध्ये होतो. त्यांनी माधुरी दीक्षित, श्रीदेवी यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांना नृत्याचे धडे दिले होते.