नवी दिल्ली : भारताची चंद्रावरील तिसरी स्वारी 2020मध्ये राबवण्यात येईल. चांद्रयान तीन मध्ये चंद्रावर लॅंडर आणि रोव्हर सुखरूपपणे उतरवण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे अवकाश खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र प्रसाद मंगळवारी म्हणाले.
आणखी एक लॅंडर आणि रोव्हर मोहीम 2020 मध्ये राबवण्यात येईल. चांद्रयान 2 संपूर्ण अपयशी झाली असे म्हणता येणार नाही कारण त्यातून आपण खूप काही शिकलो आहोत. जगातील कोणत्याही देशाला पहिल्या प्रयत्नात चंद्रावर उतरता आले नाही. अमेरिकेनेही खूप प्रयत्न केले. मात्र आपल्याला येवढ्या प्रयत्नांची गरज नाही, असे प्रसाद यांनी सांगितले.
चांद्रयान 2 हा चंद्राच्या भूमीवर उतरण्याचा भारताचा पहिला प्रयत्न होता. मात्र चंद्राच्या भूमीपासून अवघ्या 2.1 किमी अंतरावर असताना काही तांत्रिक बिघाड झाले आणि लॅंडर नियोजित स्थानाच्या आधी 500 मिटर पडले. सात सप्टेंबरला हा प्रकार घडला होता. हे लॅंडिंग निट न झाल्याची कबुली संसदेत प्रसाद यांनी दिली होती.
चंद्राजवळ गेल्यावर निर्धारीत काळाच्या आधी यानाचा वेग कमी झाला. त्यामुळे लॅंडरच्या विलगीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे हा विक्रम लॅडरचे 500 मिटर आधी हार्ड लॅंडींग झाले, असे त्यांनी उत्तरात म्हटले होते.