नवी दिल्ली: केंद्रसरकारने गंगा शुद्धीकरणासाठी सुरू केलेल्या नमामी गंगे प्रकल्पासाठी गेल्या पाच वर्षांमध्ये तब्बल 20 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला गेला असल्याची माहिती बुधवारी केंद्रसरकारच्या वतीने राज्यसभेत दिली आहे.
जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री रतनलाल यांनी राज्यसभेत सांगितले की, गंगा नदीला प्रदुषण मुक्त करण्यासाठी आम्ही वचनबद्ध असून या प्रकल्पासहित मागिल काही चांगल्या योजनांच्या पुनर्जिवनासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ज्या द्वारे आम्ही प्रदुषणावर लवकरच मात करू. यावेळीपुढे बोलताना ते म्हणाले की, गंगा नदीला प्रदुषणाबाहेर आणण्यासाठी आम्ही गेल्या पाच वर्षात चांगले काम केले असून नमामी गंगे प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी आम्ही तब्बल 20 हजार कोटी उपलब्ध केले आहेत.
तसेच यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, हिमालयातील हिमनग वेगाने वितळत असून याच वेगाने ते वितळत राहिले तर आगामी काही काळात नदीची स्थिती चिंताजनक होईल त्यामुळे आगामी काळात या नदीवर आणखीन धरणांची बांधकामे करु नयेत अशा सुचना देखील त्यांनी यावेळी केल्या आहेत.