नवी दिल्ली – अरुणाचल प्रदेशात नियंत्रण रेषेवर चीनचे सुमारे २०० सैनिक तिबेटच्या दिशेने भारतीय सीमेत घुसले हाेते. काही चिनी सैनिकांना ताब्यात घेण्यात आले. चिनी सैनिक मागे हटण्याच्या आधी भारतीय सैनिकांशी त्यांचा सामना झाला. या घटनेत भारतीय सुरक्षा दलाची हानी झाली नाही.
अरुणाचलमध्ये धुमश्चक्रीची घटना दीर्घकाळानंतर घडली आहे. पूर्व लडाखमध्ये गेल्या वर्षी मेपासून चीन व भारताचे सैन्य आमने-सामने आले आहे.
पूर्व लडाखमध्ये दीड वर्षापेक्षा जास्त काळापासून तणाव सुरू असतानाच अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्याच्या कुरापती उजेडात आल्या आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत व चीनचे सैनिक गेल्या आठवड्यात आमने-सामने आले हाेते. सध्याच्या प्राेटाेकाॅलनुसार दाेन स्थानिक कमांडर यांच्यातील चर्चेनंतर चिनी सैनिकांनी पलायन केले. सीमावाद साेडवण्यासाठी ३-४ दिवसांत कमांडर स्तरीय १३ वी बैठक हाेण्याची शक्यता आहे. अजून त्याची तारीख निश्चित झालेली नाही.
सुमारे ९ महिन्यांपूर्वी चिनी सैनिकांनी अरुणाचलमध्ये भारताच्या सीमेपासून साडेचार किमी अातमध्ये गाव वसवल्याचे सांगण्यात आले. हे गाव सुबनसिरी जिल्ह्यात सारी चु नदीच्या किनारी आहे. चीनच्या १०० सैनिकांनी ३० आॅगस्ट राेजी उत्तराखंडच्या बाराहाेती सेक्टरमध्ये घुसखाेरी केली आणि तीन तास तेथे राहिल्यानंतर ते परतले.
अरुणाचल प्रदेशाला लागून असलेल्या भागात चीन मोठ्या प्रमाणात बांधकामे करू लागला आहे. त्यात ब्रह्मपुत्र नदीवर अनेक मोठे जलविद्युत प्रकल्पांचाही समावेश आहे.