गुवाहाटी – आसाममधील 20 जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तब्बल 2 लाख लोक प्रभावित झाले आहेत. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वेमार्गांचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्याशिवाय, अनेक भागांत संपर्क यंत्रणाही खंडित झाल्या आहेत. पूरग्रस्त भागांत वेगाने मदत आणि बचाव कार्य हाती घेण्यात आले आहे. त्यामध्ये आपत्ती प्रतिसाद दलांबरोबरच प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिकही सहभागी झाले आहेत.
आसाममधील 7 जिल्ह्यांत 55 मदत छावण्या उघडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सुमारे 33 हजार लोकांनी आश्रय घेतला आहे. भूस्खलनाच्या दुर्घटनांमुळे डिमा हासाओ जिल्ह्याचा संपर्क राज्याच्या इतर भागांपासून तुटला असल्याचे समजते.