नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2 लाख 35 हजार 852 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.
देशात सध्याच्या बेरोजगारीच्या काळात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची वाढती मागणी आहे, त्यामुळे या योजनेसाठी यात 40 हजार कोटी रुपयांच्या वाढीव खर्चालाही मंजुरीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
चालू आर्थिक वर्षातील या पहिल्या पुरवणी मागण्या होत्या. पंधराव्या वित्त आयोगाने केलेल्या शिफारशींनुसार राज्यांना अतिरिक्त पुरवठा म्हणून 46 हजार 602 कोटी रुपये दिले जाणार आहेत. त्याचाही या मागण्यांच्या प्रस्तावात समावेश आहे.
करोनाच्या स्थितीमुळे सरकारी महसुलात मोठ्या प्रमाणात घट आल्याने खर्चाच्या बाबतीत सरकारला सध्या कसरतच करावी लागत आहे.