मुंबई – लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम 188 नुसार 2 लाख 14 हजार 594 गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच 31 हजार 995 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. 22 मार्च ते 28 जुलै या कालावधीत अत्यावश्यक सेवेसाठी 6 लाख 62 हजार 433 पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत. पोलिसांवर हल्ला होण्याच्या 322 घटना घडल्या असून या प्रकरणात 881 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात पोलिसांकडे मदत मागण्यासाठी 100 नंबरवर 1 लाख 08 हजार 732 फोन आले. तसेच राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे, अशा 824 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले. अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर 1346 गुन्हे दाखल करण्यात आले.
तर करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मुंबईतील 50 पोलीस व 4 अधिकारी अशा एकूण 54 जणांचा मृत्यू झाला. तर ठाणे शहरात 10 व ठाणे ग्रामीण 2 व 1 अधिकारी मरण पावले. रायगड 2,पुणे शहर 3, नाशिक शहर 1,सोलापूर शहर 3,अमरावती शहर 1,मुंबई रेल्वे 4,नाशिक ग्रामीण 3,जळगाव ग्रामीण 1,जालना एसआरपीएफ 1 अधिकारी,नवी मुंबई एसआरपीएफ 1, पालघर ग्रामीण 2 व 1 अधिकारी,ए.टी.एस. 1,उस्मानाबाद 1,औरंगाबाद शहर 1,जालना ग्रामीण 1, नवी मुंबई 1, सातारा1, अहमदनगर 1,औरंगाबाद रेल्वेच्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.
राज्यात 206 पोलीस अधिकारी व 1693 पोलीस कर्मचारी करोना बाधित असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.