रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालातील निरीक्षण
मुंबई – एप्रिल ते जून या कालावधीत अखिल भारतीय घर किंमत निर्देशांक 2.8 टक्क्यांनी वाढला आहे. रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, देशातील दहा मोठ्या शहरांतील घरांच्या किमतीच्या आकडेवारीचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे.
यासाठी अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, जयपूर, कानपूर, कोलकाता, लखनौ आणि मुंबई शहरांचा विचार करण्यात आला. गेल्या वर्षी एप्रिल ते जून या तिमाहीत घरांच्या किमती 3.4 टक्क्यांनी वाढल्या होत्या. विविध शहरांत घरांच्या किमती विविध प्रमाणात वाढल्या आहेत.
बंगळुरूमध्ये 16.1 टक्क्यांनी तर दिल्लीत 6.7 टक्क्यांनी घराचे दर वाढले असल्याचे अहवालात म्हटले आहे.