कोलंबो – शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून नुकतीच उभय संघात 3 सामन्यांची वनडे मालिका पार पडली आहे. पाहुण्या भारताने या वनडे मालिकेत यजमान श्रीलंकेचा 2-1 ने पराभव केला आहे. यानंतर आता सर्वांचे लक्ष आगामी टी20 मालिकेवर लागले आहे.
भारत वि. श्रीलंका याच्यांतील तीन सामन्याच्या टी20 मालिकेला आज, 25 जुलै रोजी प्रारंभ होत असून पहिल्या टी20 सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल (टाॅस) हा श्रीलंकेच्या बाजूनं लागला आहे. श्रीलंकेने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
Sri Lanka choose to field first in the opening T20I.
Who are you backing?#SLvIND | https://t.co/LjwbAGMESN pic.twitter.com/qKTPhyetrm
— ICC (@ICC) July 25, 2021
दरम्यान, शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून नुकतीच उभय संघात 3 सामन्यांची वनडे मालिका पार पडली आहे. पाहुण्या भारताने या वनडे मालिकेत यजमान श्रीलंकेचा 2-1 ने पराभव केला आहे.