मुंबईः उच्च न्यायालयाच्या निकाला नंतर शुक्रवारी रात्री आरेतील झाडे तोडण्यास सुरवात केली होती. त्यानंतर पर्यावरण प्रेमींनी आरेमध्ये आंदोलन उभ केल होत. त्यावर आंदोलन करणाऱ्या ३८ जणांना पोलिसांनी शनिवारी अटक केली होती. त्यानंतर या सर्वांना बोरिवलीच्या कोर्टात हजर केले असता २९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता २९ जणांना कोर्टाने रविवारी जामीन मंजूर केला आहे.
दरम्यान उच्च न्यायालयाने वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या याचिका शुक्रवारी फेटाळताच प्रशासनाने सुमारे ५00 कापली आहेत. पर्यावरण प्रेमी आणि ‘आरे वाचवा’ मोहिमेच्या आंदोलकांना याची माहिती मिळताच त्यांनी रात्रीपासून या ठिकाणी धाव घेत आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर आंदोलकांना अटक कऱण्यात आल होत.
पोलिसांनी आज आंदोलन करणाऱ्या ३८ जणांना अटक केली. या सर्वांना कोर्टात हजर केले असता यातील २९ जणांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच ५५ जण ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेली तत्काळ याचिका आज दाखल करून घेण्यास हायकोर्टाने नकार दिल्याने पर्यावरणप्रेमींना मोठा झटका बसला आहे.