मुंबई – राज्य परिवहन महामंडलातील संपकर्त्या कर्मचाऱ्यांपैकी 18 हजार कर्मचारी आज कामावर पुन्हा रुजू झाले. मात्र अजूनही मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी आपला संप सुरू ठेवला आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, अशी संपकर्त्या कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. “एसटी’ कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक गेल्या 31 दिवसांपासून विस्कळीत झाली आहे. एकूण 92,266 कर्मचाऱ्यांपैकी 18 हजार 090 कर्मचारी आज कामावर पुन्हा रुजू झाले आहेत. त्यामध्ये 2,130 चालक आणि 2,112 वाहकांचा समावेश आहे, असे महामंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले.
रायगड जिल्ह्यातील मालेगावसारख्या ठिकाणच्या डेपोमधील सर्व कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. कोल्हापूर डेपो आणि सांगलीतील बससेवा आता पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरू झाली आहे, असेही या प्रवक्त्याने सांगितले.
शुक्रवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांच्या संघटनेशी चर्चा केल्यानंतर कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा रुजू होण्याचे आवाहन केले होते. कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचारयंवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला होता.
महामंडळाने आतापर्यंत 3,215 कायम कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे आणि 1,226 देनंदिन रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली आहे.