अबजुा : नायजेरीच्या किनाऱ्यावर समुद्री चाचांनी पळवून नेलेल्या जहाजावरील 18 भारतीय नागरीकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे अशी माहिती नायजेरियातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.
या जहाजावरील 19 नागरीकांचे 3 डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यात 18 भारतीय नागरीक होते. त्यांच्या सुटकेसाठी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने आभार मानले आहेत.
या जहाजाचे अपहरण झाल्याचे कळाल्यानंतर आणि त्यावर भारतीय नागरीकांची संख्या मोठी असल्याचे समजल्यानंतर नायजेरियातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी त्या देशांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता.
या भारतीय नागरीकांची सुटका झाल्यानंतर त्यांच्या पुढील व्यवस्थेसाठी भारतीय उच्चायुक्त कार्यालय कार्यरत आहे त्यांना लवकरच त्यांच्या मुळ ठिकाणी सुरक्षित पोहचवले जाईल अशी हमीही या कार्यालयाने दिली आहे.