काठमांडू – नेपाळमध्ये गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आलेला पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे आतापर्यंत किमान 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य 21 जण बेपत्ता झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
नेपाळमध्ये गेल्या आठवड्यापासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण नेपाळमध्ये मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. अतिकरिक्त पावसामुळे नेपाळमधील नद्यांना पूर आला आहे. त्यामुळेही सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
नेपाळ पोलिस, लष्कर आणि सशस्त्र पोलिस दल यांच्यामार्फत बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. संपूर्ण नेपाळमध्ये 4 महिला आणि 3 बालकांसह एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे, असे नेपाळ पोलिसांच्या मुख्यालयाच्या सूत्रांनी म्हटले आहे.
काठमांडूच्या पूर्वेस 300 कि.मी. पूर्वेकडील सिंधुपालचौक जिल्ह्यात भूस्खलन आणि पूरात चार लोक ठार झाले. दोती येथे तीन आणि सप्तरी, काव्रे, गोरखा, कास्की, अर्घाखाची, पलपा, प्यूथान, जुमला, कालिकोट, बझांग आणि बाजुरा जिल्ह्यात प्रत्येकी एक ठार झाल्याचे त्यांनी सांगितले. सिंधुपालचौक जिल्ह्यातील मेलमची भागात वीस लोक आणि बाजुरा येथून एक बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, भरचलेल्या भोटेकोशी नदीमुळे लारचा आणि कोदरी बाजार परिसरातील रस्त्यंचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सिंधुपालचोकमधील टाटोपाणी सीमा शनिवारपासून बंद आहे, शनिवारी रात्री कांचनपूरमधील बांधकां सुरू असलेल्या धरणाचा पूल महाकाली नदीच्या पूरात वाहून गेला आहे. पुरामुळे देशातील अब्जावधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.