Strike: राज्यातील 17 लाख शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयात या संपाचा बसणार मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी असे मिळून सुमारे १७ लाख कर्मचारी प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकारने संप बेकायदेशीर ठरवत संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपाचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन पासून तर कर्मचारी भरती संदर्भातील अनेक मागण्या आहेत. आज सकाळपासून राज्यभरातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिल्यामुळे शासकीय कार्यालयातील व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. Strike या संपाला रुग्णालयातील कर्मचार्यांनीही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शहरी, ग्रामीण भागातील सरकारी कार्यालयासह शाळा, रुग्णालयातील कामकाज ठप्प होणार आहे. दरम्यान, संपात सहभागी होणार्या कर्मचार्यांवर प्रशासनाने कारवाईचा इशारा दिला आहे. नेमकी मागणी काय? (Strike) दरम्यान, राज्य सरकारच्या वतीने सन २०२४ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतनासंदर्भात नियम आणि कार्यपद्धती तसेच शर्ती तसेच अटी विषद करणारी अधिसूचना दोन वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप काढण्यात आलेली नाही. त्यामुळे १ मार्च २०२४ पासून आजपर्यंत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्पुरते निवृत्तीवेतन देखील प्राप्त झालेले नाही. निवृत्तीचे वय ६० करा, ही मागणी अनेक वर्षे प्रलंबित आहे. चतुर्थ श्रेणी आणि वाहनचालकांच्या पद भरतीस १०० टक्के बंदी लादण्यात आली आहे. या अव्यवहार्य निर्णयाचा फेरविचार करण्याची समितीची मागणी आहे. कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा राज्य सरकारने संप बेकायदेशीर ठरवत संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असून संपकाळातील वेतनही देण्यात येणार नाही. याशिवाय कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’अंतर्गतही कारवाई करण्यात येणार आहे. Strike हेही वाचा: Mohit Suri : ‘सैयारा’फेम जोडी पुन्हा एकत्र दिसणार! दिग्दर्शकाने केली आगामी चित्रपटाची घोषणा