लंडन – आधुनिक जगात जीवनशैली झपाट्याने बदलत चालली आहे त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावरही दिसू लागला आहे मिळालेल्या एका माहितीप्रमाणे ब्रिटनमधील तब्बल 17 लाख तरुण मुलं आपल्या पालकांच्या कमाईवरच जीवन जगत आहेत आणि कोणताही कामधंदा किंवा नोकरी करत नाहीत ब्रिटनमधील मुली मात्र झपाट्याने स्वावलंबी होत आहेत ब्रिटनमधील 18 ते 24 या वयोगटातील मुलांचे हे वास्तव चित्र नुकतेच समोर आले आहे.
या मुलांनी ना धड आपले शिक्षण पूर्ण केले आहे किंवा शिक्षण जरी पूर्ण केले असले तरी कोणतीही नोकरी करण्याची किंवा धंदा व्यवसाय करण्याची त्यांची मानसिकता नाही आपल्या पालकांनी एवढे कमवून ठेवले आहे तर आम्हाला व्यवसाय किंवा नोकरी करण्याची गरज काय अशी मानसिकता त्यांची तयार झाली.
असून पालकांच्या कमाईवरच दैनंदिन गरजा भागवण्याचे काम ही पिढी करत आहे ब्रिटन मधील कामगारांची एकूण संख्या बघता पुरुषांच्या तुलनेत तेथे महिलांची संख्या झपाट्याने वाढली आहे कौटुंबिक जीवनामध्येही पुरुषांपेक्षा महिलांचे महत्त्व वाढत चालले आहे महिलांची निर्णय क्षमता जास्त चांगली असल्याने त्याचाही परिणाम दिसू लागला आहे ब्रिटनमधील ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स या संस्थेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीप्रमाणे ब्रिटनमधील तब्बल 32% युवा पिढी बेरोजगार आहे त्यात मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे ब्रिटनमधल्या दहा टक्के मुलांनी कधीही रोजगार शोधण्याचा प्रयत्न केला नाही.
असे या अहवालातून समोर आले आहे वयाच्या 24 वर्षापर्यंतचे 32 टक्के युवक आपल्या मातापित्यांसोबतच राहात असल्याने त्यांना काम करण्याची कोणतीही गरज वाटत नाही मॉर्गन स्टेनली या संस्थेने दिलेल्या माहितीप्रमाणे या मुलांना घरगुती खर्चाबाबत काहीही माहिती नसते घरातील अन्नधान्याची व्यवस्था कशी होते दैनंदिन खर्च कसे भागवले जातात याबाबत त्यांना कोणतीही कल्पना नसते मात्र दुसरीकडे त्यांचे चैन आणि महागडे खर्च मात्र सुरूच असतात एकीकडे कामकरी लोकसंख्येचे वय वाढत असताना नव्या पिढीला मात्र काम करण्याची इच्छा राहिलेली नाही.
हे धोकादायक संकेत असल्याचे समाजशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे 18 ते 24 या वयोगटातील युवकांचे समुपदेशन करण्याची कोणती व्यवस्था अद्याप पर्यंत ब्रिटनमध्ये उभारण्यात आली नसल्याने त्याचा नकारात्मक परिणाम आता दिसू लागला असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे शिक्षण घेणाऱ्या किंवा शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरीच्या शोधात असलेल्या युवा पिढीला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी एखादी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे मत आता व्यक्त होत आहे.