नवी दिल्ली : कोरोनाने आपला फास देशाभोवती आवळला आहे. दिवसेंदिवस देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाकडून दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात सध्याच्या घडीला कोरोना बाधितांचा आकडा २३०१ वर पोहोचला आहे, मात्र दिलासादाक बातमी अशी की यातल्या १५६ लोकांनी आजारावर मात केली आहे त्यांना डिस्चार्जही देण्यात आला असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे.
कोरोनाने देशात थैमान सुरु केला असून राज्यातील कोरोना विषाणू बाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्याच्या घडीला राज्यातला आकडा हा ४२३ आहे. यातल्या ४२ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज दिला आहे. तर कोरोनामुळे देशात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही ५६ वर पोहोचली आहे.
आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी अनेकांना आरोग्याच्या गंभीर समस्या होत्या. मात्र आनंदाची बाब म्हणजे केरळमधील ९३ वर्षांचे रुग्ण आणि त्यांची ८८ वर्षांची पत्नी ही या आजारावर मात करुन ठणठणीत बरे झाले आहेत.