पुणे – कर्मचारी समस्या निवारण दिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांनी कर्मचाऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. जवळपास 154 तक्रारी फोनद्वारे कर्मचाऱ्यांनी केल्या.
या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी पुढील पंधरा दिवसांमध्ये कार्यवाही करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बैठकीमध्ये सर्व विभागप्रमुखांना दिले.
कर्मचाऱ्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक देऊन दोन तासांची वेळ देण्यात आली होती. त्याद्वारे कर्मचाऱ्यांनी त्यांना आलेल्या अडचणींबाबत तक्रारी केल्या. यामध्ये जवळपास सर्वच विभागांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कर्मचाऱ्यांचे कुठे म्हणणे मांडायचा असा प्रश्न असताना जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांसाठी तक्रार मांडण्यांची संधी दिल्याने कर्मचाऱ्यांकडून उपक्रमाचे स्वागत केले. आता तक्रारींची दखल घेऊन संबंधित विभागप्रमुखांनी उपाययोजना करण्याची अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.