पुणे – आळंदी येथे संत ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पुणे विभागातून एसटीच्या १५० जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती एस.टी प्रशासनाने दिली आहे.
संजीवन समाधी सोहळ्यासाठी आळंदी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. त्यांच्या सोईसाठी शुक्रवार (दि. 22) ते सोमवार (दि. 25) दरम्यान पुणे विभागातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
आळंदी या ठिकाणी चार दिवस विविध कार्यक्रम असतात. त्यानिमित्त आळंदी येथे स्वतंत्र वाहनतळ तयार करण्यात येणार आहे. याबाबत वाहतूक पोलिसांशी चर्चा सुरू
असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे.