फतेहपूर – उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील खागा भागात 6 ऑगस्ट 1996 रोजी तिहेरी हत्याकांड झाले होते. त्या प्रकरणात पंधरा जणांना आज स्थानिक कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच या आरोपींनी प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचा दंडही कोर्टाने ठोठावला आहे.
खासगी प्रवासी बसेसच्या चालकांकडून प्रति प्रवासी 20 रुपयांचा हप्ता घेण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादातून ही तीन जणांची हत्या करण्याचा प्रकार घडला होता. ज्या टोळीतील तीन जणांची हत्या झाली त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दुसऱ्या प्रतिस्पर्धी टोळीतील 18 जणांना अटक करून त्यांच्यावर हा खटला भरला होता. 24 वर्षांनी त्याचा निकाल लागला.
दुसऱ्या गटाच्या आठ जणांवरही खुनी हल्ल्याचा खटला दाखल झाला होता. न्यायालयाने यातील अन्य आरोपींना निर्दोष सोडून कोर्टाने पंधरा जणांना जन्मठेप ठोठावली.