बचाव कार्यावेळी बोट उलटल्याने घडली दुर्घटना
आणखी 16 जण बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू
स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासकीय पथक बचावकार्यात सहभागी आहे. घटनास्थळी आक्रोश आणि गोंधळ सुरू आहे. गावात आणखी ग्रामस्थ अडकून पडले असून, त्यांच्यासाठी बोटींची सोय अजूनही करण्यात आलेली नाही असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर, सातारा, सांगलीत पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
सांगली – सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढत असताना नाव पलटी झाली असून नावेतील जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह सापडले असून इतर जणांचा शोध सुरु आहे. ब्रह्मनाळ येथे कृष्णा आणि येरळा नदीचा संगम होतो. सध्या कृष्णा नदीला महापूर आला असून ब्रह्मनाळ येथे नदीचे पात्र अक्राळविक्राळ बनले आहे. संपूर्ण ब्रह्मनाळ गावाला महापुराच्या पाण्याने वेढा दिला असून, गावात तीन दिवसांपासून पाणी आहे.
गावात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. गुरुवारी सकाळी ग्रामपंचायतीच्या नावेतून नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचवण्यात येत होते. नावेत क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे जण बसले होते. नाव कडेने गावाबाहेर जात असताना नावेचा पंखा पाण्यातील झाडात आणि पाईपमध्ये अडकला. नावेतील वाढलेले वजन आणि पंखा अडकल्याने नाव उलटली. पाण्याच्या प्रवाहाला प्रचंड वेग असल्याने नावेतील कोणालाच काहीही करता आले नाही. पोहता येणारे दोघेजण पाण्यात झाडाझुडपांना धरून राहिले. मात्र इतरजण बुडाले. बत्तीसपैकी जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यापैकी काही पाण्याबरोबर वाहून जाऊन कडेला अडकले होते.