पुणे – श्री क्षेत्र पंढरपूर येथे कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त राज्यातील विविध स्थानकांतून शुक्रवारी (दि. 8) 1,300 जादा एसटी बस सोडण्याचे नियोजन केले आहे. 6 ते 12 नोव्हेंबरदरम्यान जादा वाहतूक होणार आहे. याशिवाय, आवश्यकतेनुसार जादा बसेस सोडण्याचे आदेश स्थानिक एसटी प्रशासनाला दिले आहेत.
कार्तिकी यात्रेनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनाला राज्यभरातून भाविक येतात. या भाविकांच्या प्रवासाची सोय होण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रशासन जादा बसेस सोडणार आहे. या यात्रेला विशेषतः कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे या विभागांतून मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे या यात्रेसाठी मुंबई विभागातून 110, रायगड 100, सिंधुदुर्ग 30, ठाणे 30 व रत्नागिरी विभागांतून 120, पुणे विभागातून 70 विशेष जादा बसेस सोडण्यात येत आहेत.